Abstract
स्थापत्य म्हणजे स्थापन केलेले, तयार केलेले वास्तू, निवास या संदर्भात हा शब्द वापरला जातो. बांधकाम हा अगदी बोली भाषेतील शब्द दोन्ही अर्थ सांगता येईल. बांधकाम कसे करावे, त्यासाठी कोणत्या वस्तू वापराव्यात, मोजमापे, स्तंभ यासंबंधीचे शास्त्र म्हणजे स्थापत्यशास्त्र होय. हे एक पूर्ण विकसीत झालेले शास्त्र आहे. भारतात स्थापत्याची विशेष परंपरा शेकडो वर्षापासून आहे. प्रागैतिहासीक काळापासून वास्तु निर्मिती होत होती. त्या काळातील मानवाने स्वत:साठी जो निवारा बांधला तो एक स्थापत्याचाच प्रकार होता. पुढे जस जशा गरजा वाढल्या तस-तसे वास्तूत बदल होत गेले. बांधकामाची नियमावली तयार झाली आणि शास्त्र तयार झाले. बांधकामाचा अनुभव, बदल, तंत्रातील प्रगती यामुळे आज परिपूर्ण स्थापत्य आपल्याला पहावयास मिळते.
भारतीय स्थापत्याचे प्रकार पाहायचे झाल्यास स्थूल मानाने दोन मुख्य प्रकार मानता येतात. एक म्हणजे धार्मिक स्थापत्य आणि दुसरे लौकिक स्थापत्य होय.
रायगड हा अतिशय मजबूत अभेद्य असा किल्ला असून या किल्ल्याचे बांधकाम देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यामध्ये रायगडाच्या उंचच उंच पायऱ्या, बुरुज, नाना दरवाजा, धान्य कोठार, मशीद मोर्चा, मदनशहाची कबर, महादरवाजा, बुरुज, लोहस्तंभ, हत्ती तलाव, गंगासागर, मनोरे, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राणीवसा, राजभवन, रत्नशाळा, सदर महाल, राजसिंहसन, नगारखाना, शिरकाई, सचिवांची घरे, दारूचे कोठार, कुशावर्त तलाव, ब्राह्मण वाडा, बाजारपेठ, पिलखाना, जगदीश्वर मंदिर आणि शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण आणि शिवाजी महाराजांची असलेली समाधी हे सर्व रायगडाच्या स्थापत्य आणि वास्तुविशेष वैशिष्टे आहेत.